मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
नाशिक, दि. ८ : महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला…
विजयादशमीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा…
जिल्ह्यातील मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात १६ हजार १६६ निवडणूक अधिकारी कर्मचारी होणार नियुक्त
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 16 लाख 8 हजार 858,…