मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथी; पहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
बुलढाणा, दि.२३ : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर आजपासून शाळांचे सत्र सुरु झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय…
विधानसभा प्रश्नोत्तरे
ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२४ :- राज्य शासनाने ड्रग्ज रॅकेटविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून ड्रग्ज प्रकरणात…
व्यासंगी इतिहास संशोधकाला महाराष्ट्र मुकला
मुंबई, दि. १८: – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ऐतिहासिक पुराव्यासह जगासमोर मांडणाऱ्या व्यासंगी इतिहास संशोधक, मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे.…