मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन
मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी १.०५…
महसूल विभागाने अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे काम करावे – अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे
ठाणे,दि. १० (जिमाका): महसूल विभाग शासनाचा चेहरा असून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे विभागाने काम करावे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
मुंबई, दि. २३ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने…