मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 23 – राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या…
शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
सांगली, दि. 10 (जि. मा. का) : राज्य शासनाने गेल्या दीड वर्षात सामान्य जनतेच्या व शेतकऱ्याचे हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय…
धुळे लोकसभा मतदारसंघ पूर्वपीठिकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन
धुळे, दिनांक 12 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस…