मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीत वाढ करण्याबाबत निर्णय घेऊ – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुंबई, दि. १३: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई…
विधानमंडळाच्या ग्रंथालय समितीची सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालय समितीची बैठक झाली. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या…
नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
१२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड पाऊस थांबताच शेती व अन्य पंचनामे करणार किनवट, हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस प्रकल्प भरले…