मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या प्रस्तावासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत
मुंबई, दि. ३ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.…
संतांच्या शिकवणीतून मराठवाड्याला संघर्षशीलतेचा मंत्र मिळाला : अजित पवार
उमरज : कलशारोहण सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची भेट नांदेड ( उमरज ता. कंधार ) दि. २८ फेबुवारी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला सहजासहजी…
आता राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘राज्यस्तरीय कृषी महोत्सव’चे उद्घाटन सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द बीड, दि. 21 : लाडकी बहीण व लाडका भाऊ…