मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती,सूचना मागवा मुंबई, दि. २५: महानगरांमध्ये वाहतुक…
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम…
राजकीय पक्ष अन् उमेदवारांच्या जाहिरातींवर ठेवून आहे लक्ष…; माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष..!
भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व…