मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
बीडची विकसित जिल्हा अशी ओळख घडवू – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे
बीड, दि. २६ (जिमाका): बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे.…
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा
सांगली दि.१४ (जिमाका) : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय…
महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्र
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार चर्चासत्राचे होणार उद्घाटन कृषी विभाग आणिएमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम मुंबई, दि.१९…