दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

जखमींना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याविषयी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *