मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा
मुंबई, दि. ७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर येथे उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या…
युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित…
नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे उद्या उद्घाटन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकृत संकुल उद्या रविवार, दि. २ मार्च…