मुंबई, दि ४ : सामान्य प्रशासन विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाद्वारे आयोजित ‘टेक-वारी २.० – महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी राज्य-नेतृत्वाखालील क्षमता-बांधणी उपक्रमांपैकी एक आहे. मंत्रालयात ४ ते ८ मे २०२६ दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आरोग्य, प्रशासकीय उत्कृष्टता आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडून सुमारे १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सक्षम करणे हा आहे.
त्रिमूर्ती प्रांगण येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, क्षमता विकास आयोगाच्या (सीबीसी) अध्यक्षा राधा चौहान उपस्थित होते. राज्याच्या प्रगतीमधील आघाडीच्या कार्यकर्त्यांला (फ्रंटलाइन वर्कर्स) व प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
तबला वादक निलेश परब यांच्या ‘तालरंग: लय आणि सांघिक कार्याचा प्रवास‘ या ऊर्जापूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उच्च-स्तरीय अंतदृष्टी आणि मानसिक आरोग्य
डिजिटल गव्हर्नन्स यासंदर्भात अमिताभ कांत (माजी सीईओ, नीती आयोग), राधा चौहान (सीबीसी), राजेश अग्रवाल (मुख्य सचिव), सदानंद दाते (डीजीपी, महाराष्ट्र), आणि डॉ. विवेक राघवन (सह-संस्थापक, सर्वम एआय) यांनी डिजिटल प्रशासनाचे विकसित होत असलेले स्वरूप आणि एआय-चालित कार्यक्षमतेचा आढावा घेतला.
मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकास: मनशक्ती संशोधन केंद्राने मेंदूच्या क्षमता वाढवण्यावर सत्रे आयोजित केली. साथ मेळा होलिस्टिक हेल्थ कॅम्पने कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी संसाधने उपलब्ध करून दिली.
तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर
त्रिमूर्ती प्रांगण एका टेक हबमध्ये रूपांतरित झाले, जिथे १० जागतिक नेत्यांनी थेट प्रात्यक्षिके सादर केली. मेटा (शासनासाठी व्हॉट्सॲप): एक ‘ॲप-विना‘ गेटवे, जो नागरिकांना व्हॉट्सॲपवरील सोप्या व्हॉइस कमांडद्वारे वीज, आरोग्यसेवा आणि पोलीस सेवा मिळवण्याची सुविधा देतो.
फ्लॅम.अल (व्हिज्युअल एजंट): प्रभावी जनजागृती मोहिमांसाठी एक एआय-नेटिव्ह मिक्स्ड रिॲलिटी प्लॅटफॉर्म, जो कमी क्षमतेच्या स्मार्टफोनवरही १०० मिलिसेकंदांपेक्षा कमी वेळेत चालण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
राज्यव्यापी सहयोगी प्रयत्न
‘टेक-वारी २.०’ हे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाद्वारे सह-प्रायोजित आहे. याचा प्रभाव प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचावा यासाठी, सर्व सत्रे राज्यातील विशाल मनुष्यबळासाठी थेट प्रक्षेपित (लाइव्ह-स्ट्रीम) केली जात आहेत. हे तंत्रज्ञान प्रदर्शन ८ मे पर्यंत दररोज खुले राहील, जे सरकारी अधिकारी आणि जागतिक तंत्रज्ञान नवोन्मेषकांमध्ये थेट संवादाला प्रोत्साहन देईल.
‘टेक-वारी 2.0’ मध्ये व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
००००