साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय धुळे संकलित साहित्य संमेलने पार पडलेल्या ठिकाणांविषयी माहिती देणारा लेख…
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।
असे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहून ठेवले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यामुळेच यंदाचे देशाची राजधानी दिल्लीत होत असलेले 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असणार आहे हे ही विशेष. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन 1878 मध्ये पुण्यात झाले होते, ज्याचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे हे होते. तर 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झाले असून या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.
आतापर्यंत झालेल्या 97 मराठी साहित्य संमलेनापैकी सर्वाधिक 14 संमलने आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्यास मिळाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत 10 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यात सन 1936 साली 22 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे संपन्न झाले. त्यानंतर 1939 साली अहमदनगर, 1942 नाशिक तर 29 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धुळे जिल्ह्यात 1944 साली झाले असून या संमलेनाचे अध्यक्ष भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे होते. त्यानंतर 1952 अमळनेर (जि. जळगाव), 1984 जळगाव, 1997 अहमदनगर, 2005 आणि 2021 नशिक तर 2024 मध्ये अमळनेर (जि. जळगाव) येथे झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा, साहित्य आणि विचारांबाबत मौलिक अशी मेजवाणी साहित्यरसिकांना मिळते. मराठी साहित्य जगतास दिशा दाखवणारे व विचार देणारे अध्यक्षीय भाषण हे या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. संमेलनातील विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे मानवी जीवनमूल्यांचे व विचारांचे पोषण घडते. पुस्तकांचे अफाट विश्व ग्रंथप्रदर्शन व पुस्तकांच्या लावलेल्या स्टॉलमधून उलगडत जाते. साहित्य हे जगण्यासाठी महत्वाचे सांस्कृतिक मूल्य आहे यांची जाणीव अशा संमेलनातून होते. समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास या साहित्य संमेलनामुळे मदत मिळते. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या संमलेनाचे ठिकाण व त्यांचे अध्यक्ष यांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाची माहिती..
संमेलन
वर्षे
ठिकाण
अध्यक्ष
1
1878
पुणे
न्या. महादेव गोविंद रानडे
2
1885
पुणे
कृष्णशास्त्री राजवाडे
3
1905
सातारा
रघुनाथ पांडूरंग करंदीकर
4
1906
पुणे
वासुदेव गोविंद कानिटकर
5
1907
पुणे
विष्णू मोरेश्वर महाजनी
6
1908
पुणे
चिंतापण विनायक वैद्य
7
1909
बडोदे
कान्होबा रामछोडदास किर्तीकर
8
1912
अकोला
हरी नारायण आपटे
9
1915
मुंबई
गंगाधर पटवर्धन
10
1917
इंदूर
गणेश जनार्दन आगाशे
11
1921
बडोदे
नरसिंह चिंतामण केळकर
12
1926
मुंबई
माधव विनायक किबे
13
1927
पुणे
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
14
1928
ग्वाल्हेर
माधव श्रीहरी अणे
15
1929
बेळगाव
शिवराम महादेव परांजपे
16
1930
मडगाव
वामन मल्हार जोशी
17
1931
हैद्राबाद
श्रीधर व्यंकटेश केतकर
18
1932
कोल्हापूर
सयाजीराव गायकवाड
19
1933
नागपूर
कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर
20
1934
बडोदे
नारायण गोविंद चापेकर
21
1935
इंदूर
भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
22
1936
जळगाव
माधव जुलियन
23
1938
मुंबई
विनायक दामोदर सावरकर
24
1939
अहमदनगर
दत्तो वामन पोतदार
25
1940
रत्नागिरी
नारायण सिताराम फडके
26
1941
सोलापूर
विष्णू सखाराम खांडेकर
27
1942
नाशिक
प्रल्हाद केशव अत्रे
28
1943
सांगली
श्रीपाद महादेव माटे
29
1944
धुळे
भार्गवराव विठ्ठल वरेरकर
30
1946
बेळगाव
गजानन त्र्यंबक माडखोलकर
31
1947
हैद्राबाद
नरहर रघुनाथ फाटक
32
1949
पुणे
शंकर दत्तात्रय जावडेकर
33
1950
मुंबई
यशवंत दिनकर पेंढारकर
34
1951
कारवार
अनंत काकबा प्रियोळकर
35
1952
अमळनेर
कृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी
36
1953
अमदाबाद
विठ्ठल दत्तात्रय घाटे
37
1954
दिल्ली
लक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी
38
1955
पंढरपूर
शंकर दामोदर पेंडसे
39
1957
औरंगाबाद
अनंत काणेकर
40
1958
मालवण
अनिल
41
1959
मिरज
श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
42
1960
ठाणे
रामचंद्र श्रीपाद जोग
43
1961
ग्वाल्हेर
कुसुमावती देशपांडे
44
1962
सातारा
नरहर विष्णु गाडगीळ
45
1964
मडगाव
वि. वा. शिरवाडकर
46
1965
सातारा
वामन लक्ष्मण कुलकर्णी
47
1967
भोपाळ
विष्णु भिकाजी कोलते
48
1969
वर्धा
पु. शि. रेंगे
49
1973
यवतमाळ
गजानन दिगंबर माडगुळकर
50
1974
इचलकरंजी
पु. ल. देशपांडे
51
1975
कराड
दुर्गा भागवत
52
1977
पुणे
पु. भा. भावे
53
1979
चंद्रपूर
वामन कृष्ण चोरघडे
54
1980
बार्शी
गं. बा. सरदार
55
1981 (फेब्रुवारी)
अकोला
गो. नी. दांडेकर
56
1981 (डिसेंबर)
रायपूर
गंगाधर गाडगीळ
57
1983
अंबेजोगाई
व्यंकटेश दिगंबर माडगुळकर
58
1984
जळगाव
शंकर रामचंद्र खरात
59
1985
नांदेड
शंकर बाबाजी पाटील
60
1988
मुंबई
विश्राम बेडेकर
61
1988
ठाणे
वसंत कानेटकर
62
1989
अमरावती
केशव जगन्नाथ पुरोहित
63
1990 (जानेवारी)
पुणे
यु. म. पठाण
64
1990 (डिसेंबर)
रत्नागिरी
मधु मंगेश कर्णिक
65
1992
कोल्हापूर
रमेश मंत्री
66
1993
सातारा
विद्याधर गोखले
67
1994
पणजी
राम शेवाळकर
68
1995
परभणी
नारायण सुर्वे
69
1996
आळंदी
शांता शेळके
70
1997
अहमदनगर
ना. स. इनामदार
71
1998
परळी वैजनाथ
द. मा. मिरासदार
72
1999
मुंबई
वसंत बापट
73
2000
बेळगाव
य. दि. फडके
74
2001
इंदूर
विजया राजाध्यक्ष
75
2002
पुणे
राजेंद्र बनहट्टी
76
2003
कराड
सुभाष भेंडे
77
2004
औरंगाबाद
रा. ग. जाधव
78
2005
नाशिक
केशव मेश्राम
79
2006
सोलापूर
मारुती चित्तमपल्ली
80
2007
नागपूर
अरुण साधू
81
2008
सांगली
म. द. हातकणंगलेकर
82
2009
महाबळेश्वर
आनंद यादव
83
2010
पुणे
द. भि. कुलकर्णी
84
2010 (डिसेंबर)
ठाणे
उत्तम कांबळे
85
2012
चंद्रपूर
वसंत आबाजी डहाके
86
2013
चिपळूण
नागनाथ कोत्तापल्ले
87
2014
सासवड
फ. मुं. शिंदे
88
2015
घुमान (पंजाब)
संदानंद मोरे
89
2016
पिंपरी चिंचवड
श्रीपाल सबनीस
90
2017
डोंबिवली
अक्षयकुमार काळे
91
2018
बडोदे
लक्ष्मीकांत देशमुख
92
2019
यवतमाळ
अरुणा ढेरे
93
2020
उस्मानाबाद
फादर फ्रान्सिस
94
2021
नाशिक
जयंत नारळीकर
95
2022
उदगीर
भारत सासणे
96
2023
वर्धा
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
97
2024
अमळनेर
रविंद्र शोभणे
(संदर्भ-लोकराज्य)
०००
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, धुळे
The post आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने… first appeared on महासंवाद.